लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ प्लस जागा जिंकणार
धुळे : मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो. मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी धुळ्यात मोठे विधान करीत, यावेळी महाराष्ट्रात 48 जागांचा आकडा भाजप क्रॉस करेल, असा विश्वास व्यक्त केला.
मराठ्यांना आरक्षण (maratha reservation) न मिळण्यामागे उद्धव ठाकरेच दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. वटहुकूम काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर देखील निघाले नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंवर मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली. उत्तर महाराष्ट्रात शंभर वर्षात पहिल्यांदाच सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता लवकरच अग्रीम मदत शेतकऱ्यांना दिली जाईल, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात स्पष्ट पत्रकारांशी बोलताना केले. मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांच्या आंदोलनात झालेल्या प्रकारानंतर विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वन नेशन वन इलेक्शन निर्णय फायदा तोटा बघून नाही. यावेळी पार्लमेंटमध्ये 325 चा आकडा भाजप क्रॉस करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंडिया, भारत, हिंदुस्तान असे नाव ठेवून जर विरोधकांना वाटत असेल तसे साधू तर तसे काही होणार नाही.
हेही वाचा













