सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार, 14 डिसेंबरपासून संप
धुळे : जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने 14 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संघटनेकडून शासकीय कार्यालयांमध्ये जावून कर्मचार्यांमध्ये जनजागृती करण्यासह संपात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

सरकारने आता आमचा अंत पाहु नये, मागण्या तत्काळ मंजुर कराव्यात, अशी मागणीही यावेळी
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केली आहे. यावेळी एस. यु. तायडे, सुधीर पोतदार, सुरेश पाईकराव, दीपक पाटील, विनोद चौधरी, संजय जगताप, विजया बोरसे, बसंती पाडवी, हर्षा महाजन, माया बिर्हाडे, योगेश जिरे, शिरीष पवार, दीपक महाले, सुनिल देवकाते आदी उपस्थित होते.

जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागु करावी. 4 लाख रिक्त पदे कंत्राटी ऐवजी कायम स्वरुपी भरुन मागासवर्गीय राखीव जागा सुनिश्चित ठेवाव्यात. खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित कराव्यात, चतृर्थश्रेणी कर्मचारी, वाहनचालक पदाच्या भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करावे, भादंवि कलम 353 पुर्वीप्राणे प्रभावी करावे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट कराव्यात आदी प्रमुख मागण्या आहेत.

या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सरकारी निम सरकारी, जि. प. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सन्वय समिती, महाराष्ट्र राज्य गट ड (चतृर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघ लढा देत आहे. यासाठी विविध आंदोलन करूनदेखील अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पुन्हा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.














