शालिनी बाळासाहेब भदाणे यांनी शुक्रवारीच निवेदन दिले होते! दोंदवाड शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती!!
धुळे : तालुक्यातील दोंदवाड, रतनपुरा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी बोरकुंड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारीच केली होती. परंतु धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी मंगळवारी विद्यार्थी आणि पालकांना जिल्हा परिषदेत आणल्याने या विषयाची अधिकच चर्चा झाल्याचे पहावयास मिळाले.

धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी मंगळवारी शाळेचे विद्यार्थी आणि पालक यांना जिल्हा परिषदेत आणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिक्षकांची नियुक्ती करावी आणि गैरहजर शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थी आणि पालक जिल्हा परिषदेपर्यंत आणल्याने शरद पाटील यांनी केलेल्या या कृतीची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. परंतु दोंदवाड शाळा ज्या गटात आहे, त्या बोरकुंड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारीच याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
दोंदवाड जि. प. शाळेत चार वर्षापासून एक शिक्षक कमी आहे. या रिक्त जागेवर अजून एका शिक्षकाची नियुक्ती करा, अशा आशयाची मागणी जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी धुळे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याकडे केली. सौ. भदाणे यांनी शुक्रवारी सीईओंची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी बोरकुंड प्राथमिक आरोग्य केंद्र व रतनपुरा शाळेबाबतही त्यांनी गार्हाणे मांडले. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या समस्येवर पर्याय काढण्याचे आश्वासन यावेळी सीईओंनी दिले.
बोरकुंड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी ६ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता याची भेट घेत विविध विषयांवर निवेदन सादर केले. यात त्यांनी विविध मागण्या करत त्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. यात बोरकुंड जि. प. गटातील मौजे दोंदवाड येथील जि. प. मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या एकूण ७२ असून सध्या कार्यरत शिक्षक संख्या फक्त २ आहे. त्या ठिकाणी आवश्यक शिक्षक संख्या ३ असली पाहिजे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रती नियुक्तीवर गेलेले शिक्षक पुन्हा कार्यरत करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बोरकुंड येथे दररोज १०० ते १२० रुग्णांची ओपीडी होत असते. परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता व काही औषधांचा नेहमीचा तुटवडा लक्षात घेता रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे संबंधित अधिकार्यांना सुचना करून समस्या निकाली काढाव्यात. मौजे रतनपुरा येथे जि. प. मराठी शाळेत पटसंख्येअभावी (AADHAR UPDATE) कमी केलेल्या एका शिक्षकांची प्रती नियुक्ती करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला.














