उमेद अभियानातर्फे नवापूरला रानभाजी महोत्सव यशस्वी
नवापूर : नवापूर येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव नुकताच पार पडला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी रानभाज्यांचा आस्वाद घेऊन समाधान व्यक्त केलं.

कार्यक्रमाच उद्घाटन आमदार शिरीष नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या रजनीताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक गट विकास अधिकारी किरण गावीत, तालुका कृषि अधिकारी रविशंकर पाडवी, पोलिस निरिक्षक अभिषेक पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन सन्यासी, तालुका व्यवस्थापक अरविंद गावीत उपस्थित होते.
नवापूर तालुक्यातील 10 प्रभागातल्या 38 महिला स्वयंसहायता समुहांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला. तसेच रानातील विविध प्रकारच्या भाज्यांची विक्री केली. याशिवाय काही समुहांनी पाककृती देखील तयार करुन आणल्या होत्या. या रानभाज्या व तयार करुन आणलेल्या पाककृतींचा आस्वाद देखील मान्यवरांसह नागरीकांनी घेतला. सर्व सहभागी समुहांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन सन्यासी यांनी केलं. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक अरविंद गावीत, प्रभाग समन्वयक अरविंद बागले, देविदास पाटील, विलास चव्हाण, प्रविण राठोड, गंगावतीताई वसावे, निताताई भामरे आणि अंजनी नाईक यांनी परिश्रम घेतले.













